यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा
राजकारण

यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!” असे ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा वर निशाणा साधला आहे. तसेच, “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं” असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील लिक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबत अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर रिपब्लिक भारत हिंदी टीव्हीत विजयाच्या सेलिब्रेशनसारखं वातावरण होतं, हे या व्हॉट्सअप चॅटमधून सिद्ध होतं आहे. याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे.

बारामती येथे आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहानंतर रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? हे अतिशय गंभीर आहे. भाजपाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पत्रकार अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करणे गरजे आहे, असा टोला रोहित यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना लगावला.

इतकेच नव्हे तर, भाजपाने खरेतर अर्णब गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. व राज्य भाजपाने केंद्राला लिखित पत्राद्वारे गोस्वामी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. गोस्वामीना गोपनीय माहिती तीन दिवस अगोदरच कशी समजते. एवढी मोठी गोपनीय माहिती भाजपाची बाजू घेणाऱ्या पत्रकाराला मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंडे ऐवजी भाजपाने गोस्वामी विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.