सूर्यकुमारच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेवर ३८ धावांनी विजय
क्रीडा

सूर्यकुमारच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेवर ३८ धावांनी विजय

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेले १६५ धावांचे उद्दिष्ट गाठताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. पण सलामीवीर अविष्का फर्नाडो (२६) आणि चरित असलंका (४४) यांनी श्रीलंकेला विजयाची आस दाखवली. अखेर श्रीलंकेचा डाव १२६ धावांवर संपुष्टात आणत भारताने विजय साकारला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार बळी मिळवले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वेसण घातली तरी सूर्यकुमार यादवच्या (५०) खेळीमुळे भारताने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याला मिळालेली भुवनेश्वर कुमारची साथ यामुळे भारताला सहज विजय मिळाला.