दुसऱ्या कसोटी विजयी संघातील हे तीन भारतीय खेळाडू संघाबाहेर?
क्रीडा

दुसऱ्या कसोटी विजयी संघातील हे तीन भारतीय खेळाडू संघाबाहेर?

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने कांगारुना पराभवाची धूळ चारली. परंतु आता तिसऱ्या कसोटी सामन्या विजयी संघातील ३ खेळाडू संघाबाहेर होणार आहेत. बॉक्सिंग डे कसोटीत भारताने चार बदल केले होते आता पुन्हा संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा निवडीसाठी उपलब्ध होणार आहे. रोहितने गेल्या वर्षीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ओपनर म्हणून फलंदाजी केली होती. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयानंतर पाच गोलंदाजांना घेऊन खेळणार असल्याचे म्हटले आहे. सलामीच्या जोडीत असलेल्या शुभमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. तर त्याचा साथीदार मयांक अग्रवाल पहिल्या दोन्ही कसोटीत अपयशी ठरला त्यामुळे तिसऱ्या कसोटीतून त्याला वगळले जाऊ शकते. मयांकच्या जागी रोहितला संधी दिली जाईल. या वर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते.

रोहितला सलामीला पाठवण्या ऐवजी मधळ्या फळीत संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत विहारीच्या जागी संघात रोहित दिसू शकेल असे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले आहेत. हनुमा विहारीला देखील दोन्ही कसोटीत धावा करता आल्या नाहीत. जर मयांकच्या जागी रोहितला संधी दिली तर विहारीच्या जागी केएल राहुला संघात घेतले जाऊ शकते. मेलबर्न कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्याच्या जागी टी नटराजन याला संधी दिली जाऊ शकते.