रोहित शर्मासोबत हा फलंदाज करणार ओपनिंग? विराट कोहलीकडून स्पष्टीकरण
क्रीडा

रोहित शर्मासोबत हा फलंदाज करणार ओपनिंग? विराट कोहलीकडून स्पष्टीकरण

मुंबई : इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये उद्यापासून खेळला जाईल. या मालिकेविषयी अशी चर्चा होती की रोहित शर्माबरोबर कोणता फलंदाज ओपनिंग करेल याबाबत कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे की, रोहित सोबत सलामीवीर म्हणून टी-20 मालिकेसाठी केएल राहुल हा टीम इंडियाची पहिली निवड असेल, म्हणजेच शिखर धवनला आता थांबावं लागणार असल्याचे स्पष्ट संकेत कोहलीने दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केएल राहुल चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने या क्रमांकावर खेळतांना संघासाठी बरीच चांगली कामगिरी केली आहे. धवनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकही झळकावले आणि त्याचा फॉर्मही चांगला आहे, टी -२० विश्वचषक पाहता टीम मॅनेजमेंट, धवन ऐवजी केएल राहुलला संधी देण्याचा विचार करत आहे. तर धवनला आता बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवले जाऊ शकते.

कोहलीने स्पष्ट केले आहे की, धवन हा संघाचा बॅकअप सलामीवीर असेल, रोहित किंवा राहुल यांच्यापैकी कुणालाही दुखापत झाली तर धवनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. कोहली म्हणाला की, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आमच्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि या मालिकेसाठी आमची पहिली पसंत रोहित आणि राहुल असेल. याक्षणी हे तीनही सलामीवीर फलंदाज टीम इंडियासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहेत. रोहित शर्मा पहिला सलामीवीर आहे, परंतु राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत 224 धावा केल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तीन टी -20 सामन्यांत 81 धावा केल्या. कोहलीने भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झाल्याचेही सांगितले आहे. मला तो संघात आल्याचा आनंद आहे आणि तो देखील चांगली कामगिरी करेल. या टी -20 मालिकेसाठी भुवी संघाचा आघाडीचा वेगवान आक्रमण करणारा गोलंदाज असेल आणि त्याच्यासोबत दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन असतील, असे विराटने स्पष्ट केले आहे.