जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन
क्रीडा

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन

मोहाली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते असे युवराजने ट्वीट करत म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे युवराजने म्हटले. त्याने ट्वीट केलेल्या पत्रात जय जवान-जय किसान असा नाराही दिला आहे. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. मी या महान देशाचा सुपुत्र असून यापेक्षा मोठ्या अभिमानाची दुसरी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. तसेच, देशातील कोविड 19 च्या महामारीचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यामुळे, नागरिकांनी खबरदारी घ्यायलाच हवी. कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी आपणास पूर्ण ताकदीने लढा द्यायचा आहे, असेही युवराजने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना पत्राद्वारे आवाहन केलं आहे.

युवराजचा जन्म १२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगड येथे झाला. युवराजसिंगच्या भारतीय क्रिकेट प्रेमींना आपल्या खेळातून मोठा आनंद दिला आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये युवराजने धडाकेबाज खेळीतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रमही युवराजने केला आहे.

युवराज सिंगची कारकिर्द
एका विश्वकप स्पर्धेत ३०० धावा फटकावणारा पहिला अष्टपैलू खेळाडू.
२००७ मध्ये भारतीय वन-डे संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती
२०१४ मध्ये एफआयसीसीआयतर्फे मोस्ट इन्स्पायरिंग स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कराचा मानकरी.