आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने रविवारी जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातून मतदारांवर आश्वासनांचा पाऊसच अण्णाद्रमुक पाडला आहे. अण्णाद्रमुकने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. तसेच, […]
Tag: विधानसभा निवडणुका
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल
पश्चिमबंगाल : “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. […]
शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]
भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
रांची : ”बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर […]
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अखेर मिथुन चक्रवर्ती यांचा अधिकृतपणे भाजप पक्षप्रवेश
पश्चिम बंगाल : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पूर्णविराम दिला आहे. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी ब्रिगेड मैदानामध्ये […]
पंतप्रधान मोदीचं ममता सरकारवर टीकास्त्र; ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मतदान 27 मार्चपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. ”बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास […]
मिथुन चक्रवर्तीनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्षांची भेट; राजकारणात पुन्हा एन्ट्रीच्या चर्चांना उधाण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुंबईतील भेटीपासूनच अभिनेते मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बंगालमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. याचवेळी मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं ते आज भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. […]
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्शभूमीवर येथील राजकीय वातावरणही ढवळून निघाले असुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभावरून परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. संध्या त्यांच्यावर […]
म्हणून शिवसेना निवडणूक लढवणार नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
मुंबई : पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल, असे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी […]
पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 […]