पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
देश बातमी

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.

आसाम
आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. आसाम राज्यात 126 जागा असलेल्या भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. येथे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने येथे 60 जागा जिंकल्या होत्या. यावेळी येथे काँग्रेसही विजयाचा दावा करीत आहे. परंतु, मागील निकाल पाहता काँग्रेस 122 जागा लढवून केवळ 26 जागा जिंकू शकली. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.

तामिळनाडू

तामिळनाडूत एका टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिल रोजी मतदान होईल, तर 2 मे रोजी पाचही राज्यांच्या मतदानचा निकाल लागणार आहे. सद्यस्थितीत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम येथे सरकार चालवत असून पलानीस्वामी हे राज्याचे प्रमुख आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी जादुई आकडा 118 आहे. . मागील निवडणुकीत एआयएडीएमकेने 136 जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने 89 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 188 जागा आहे.

केरळ
केरळमध्ये सध्या सीपीआयच्या नेतृत्वाखालील डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सरकार चालवल आहेत. मागील निवडणुकीत एलडीएफला 91 आणि काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. येथे बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या तारखांपूर्वी राहुल गांधींनी येथे बऱ्याच जाहीर सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भेट दिली आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.