मुंबई : सलग काही दिवसांपासून नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली असून आज (ता. २८) नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ५ हजार ९६५ करोना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. राज्यात आज घडीला ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण […]
Author: Jaipal Gaikwad
त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ”जेव्हा त्यांच्या मतपेट्या भरत नव्हत्या तेव्हा त्यांच्यासाठी मेहनत घेत होतो. पण, आता ते आमच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. मी कधीही वैयक्तिक हल्ले करीत नाही किंवा मत्सराने बोलत नाही. जसे त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले आहे. त्यांच्याकडून विकृत प्रवृत्तीचे राजकारण होत आहे. मात्र, मी त्यांच्या स्तरावर जाऊन हल्ला करणार नाही.” असे वक्तव्य मुख्यमंत्री […]
पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत […]
सलमानचा कट्टर शत्रू असलेल्या अभिनेत्यासोबत भाऊ अरबाजची हातमिळवणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा कट्टर शत्रू असलेला विवेक ओबरॉयसोबत सलमानचा भाऊ अरबाज खान याने हातमिळवणी केली आहे. सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामधील वाद प्रत्येकाला ठाऊक आहे. दोघांमध्ये अद्यापही ३६चा आकडा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्टार एकमेकांसोबत बोलत देखील नाही. अरबाज खान आणि विवेक ओबरॉय एकत्र काम करताना प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. बॉलिवूड […]
आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. रामदास आठवले ट्विटमध्ये म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरविल, असे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. […]
जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन
बीजिंग : भारत आणि अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्शभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ”आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या […]
दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली
नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत कायदे मंजूर केल्यपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले. दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सूचवलेल्या पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन […]
धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]
तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? हे आहेत खाण्याचे फायदे
तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? नसेल तर नक्की खा, कारण नाचणीची भाकर खाण्याचे असंख्य फायदे आहेत आणि साधारणपणे आपल्या घरात ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार कमी वेळा केली जाते. नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा […]
एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई
सिडनी : एकीकडे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे भारतीय संघावर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी विजय मिळवल्यानंतर षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आयसीसीने कारवाई केली. भारतीय खेळाडूंच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापून घेतली जाणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी हा निर्णय सूनावला. पहिला एकदिवसीय […]