मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मंत्री थोरात म्हणाले, 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. […]
महाराष्ट्र
सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यात सात जिल्ह्यांत रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. थोरात म्हणाले, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या […]
ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्यातील जातीवाचक वस्त्यांच्या नावात होणार बदल
मुंबई : राज्यसरकार एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकर राज्यभरातील जातीवाचक नावे असलेल्या वाड्या वस्त्यांच्या नावात बदल करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात आजही चांभारपुरा, ब्राह्मण आळी, कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, सुतार गल्ली आदी […]
यशस्विनीमहिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी तीन जणांना अटक
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आज दुपारी पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील, अशी शक्यता आहे. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समितीचे मुख्य समन्वयक सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ५ […]
मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन
अहमदनगर : लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मात्र आता साईबाबा मंदिर प्रशासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे. मंदिरात येताना […]
खळबळजनक ! यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या […]
धक्कादायक ! बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
चंद्रपूर : आनंदवनात कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. शीतल आमटे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात होत्या. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओपदी त्या कार्यरत होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या […]
मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
मुंबई : ”मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना […]
‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’
सातारा : ”देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो,” असे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार […]