नवी दिल्ली : कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल, अशा शब्दात शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे. नव्या केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते अद्यापही ठाम असून आज केंद्रसरकारशी झालेली चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली. तसेच, शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम असून राज्यांना आपला कायदा आणू द्यावा अशी मागणी केली. १५ […]
बातमी
मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला १५ वर्षाची शिक्षा
लाहोर : मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवीला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. याआधी शनिवारी लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. लखवीला दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्या आरोप ठेवण्यात आला होता. या अटकेमागे दहशतवादी फंडिंगच्या विरोधात काम करणारे जागतिक संघटन फायनॅन्शियल अॅक्शन टास्कफोर्सचा दबाव असल्याचेही […]
लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण […]
मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी: अशोक चव्हाण
मुंबई : मराठा आरक्षणातील संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. तसेच, मराठा आरक्षणातील मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील ५० टक्क्यांची मर्यादा आणि १०२ व्या घटनादुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी बाबींचा विचार करावा, असे […]
ठरलं… 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार
यावर्षीच ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, तसेच, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येईल. असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन […]
आता अभ्यासाला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार
मुंबई : कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असताना एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी या उमेदवार करत होते. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले […]
अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला मराठीत अॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा […]
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर
मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 […]
धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला असला तरी नवा कोरोना हातपाय पसरताना दिसतो आहे. नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्याचाही धोका वाढला आहे. पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या आता 4 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील नव्या […]
विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द
मुंबई : मोठ्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे. ४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात […]