नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

परभणी : नागपूरनंतर कोरोना संसार्गावर आला घालण्यासाठी आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येला रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १३ आणि १४ मार्च रोजी लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आता नागपुरात लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

तर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसला तर कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचं वातावरण असताना पुण्यात मात्र कोरोनासंदर्भात कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला. कोरोना संसर्ग सर्वाधिक वेगानं वाढत असल्यानं लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावं, अशी मागणी केली. त्याचबरोबर, येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये 12 ते 22 मार्च या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.