अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू
देश बातमी

अपघातानंतर बसने घेतला पेट; ५ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड येथे भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.