दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी
बातमी महाराष्ट्र

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही ‘शक्ती’ कायदा लागू करण्यासाठी रविवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन विधेयके सादर केली. या विधेयकात महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. याला सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केले. यावर चर्चा होईल. सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा द्यावा, अशी माझी विनंती आहे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, या विधेयकामध्ये महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठीच्या गुन्ह्यात १५ दिवसांत गुन्ह्याचा तपास आणि आरोपपत्र दाखल करावे आणि आरोपपत्र दाखल झाल्यावर ३० दिवसांत सुनावणी पूर्ण व्हावी, अशीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. २१ दिवसांमध्ये खटल्याचा निकाल, बलात्कार, अ‍ॅसिडहल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडांची तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. विश्वासू किंवा जवळच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यास मृत्युदंड आणि १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार या गुन्ह्यांतही मृत्युदंडाची तरतूद या विधेयकात आहे. या कायद्यामुळे गुन्हेगारांना वचक बसेल.’  असा विश्वासही यावेळी गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घोषणाबाजी भाजपने विधान भवनाच्या पायरीवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याची तसेच मराठा आरक्षणाबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.