तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान
राजकारण

तर भाजप ममता बॅनर्जींची हत्या करु शकते; मंत्र्याचे धक्कादायक विधान

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुब्रत मुखर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाली नाही तर, ते गुप्तरित्या लोकांना पाठवून टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची हत्या करु शकतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेत बोलताना पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. सुब्रत मुखर्जी यांचे हे धक्कादायक विधान भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आले आहे. डायमंड हार्बरकडे जाताना नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाली होती. ज्यामध्ये नड्डा यांना दुखापत झाली नाही, मात्र भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्याह अन्य नेते जखमी झाले होते. यावरून भाजपाने आक्रमक होत टीएमसी अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणं सुरू केलं आहे. शिवाय, हा हल्ला टीएमसीच्या गुंडांनीच केला असल्याचा दावा देखील भाजपाकडून करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली असून, तीन एफआयआरची नोंद केली आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर कारवाई करत पश्चिम बंगालमधील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे.