लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप
राजकारण

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप

मुंबई : आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले. असा आरोप राज्याचे राजेश टोपे यांनी केलाय. येत्या १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला सुरवात होत आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. राजेश टोपे म्हणाले की, “मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल.

तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. 16 जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

लसीकरण केंद्रांबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे. सुरवातीला 511 लसीकरण केंद्रासाठी केलं होतं. पण काल झालेल्या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या की, लसीकरण एवढ्या मोठ्या स्तरावर करु नका. कारण लसीकरणासोबतच रुग्णालयातील इतर सेवाही सुरळीत राहणं गरजेचं आहे.