काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे थोरात आणि पटोले यांनी आज फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.