रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…
राजकारण

रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता राहुल गांधींच्या ‘या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रामदास आठवले म्हणाले की, “हम दो, हमारे दो” च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर त्यांना (राहुल गांधींना) या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवं…आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल”. असंही त्यांनी  म्हंटले आहे.

तसेच, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांना देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.