अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुखापतीतून सावरला असून अंतिम ११ खेळाडूमध्ये संधी देण्यात आली आहे. अश्निन आणि जाडेजा फिरकीपटूची धुरा सांभाळतील. तर बुमराह आणि उमेश यादव यांच्यासोबत युवा मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजाची धुरा सांभाळणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजसोबत मैदानात उतरणार आहे. वृद्धिमान साहाला आराम देण्यात आला असून त्याच्याजागी पंतला संधी देण्यात आली आहे. के. एल. राहुलला मात्र आणखी अंतिम ११ साठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

असा आहे भारतीय संघ –
शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज