मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन आज दहाव्या दिवशीही सुरूच आहे. शाविवारी झालेली केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. अशातच ९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. […]
Tag: शेतकरी आंदोलन
बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशभरातून विविध स्तरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. अशातच देशातील खेळाडूंनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास आपले पुरस्कार परत करण्याचीदेखील घोषणा केली आहे. यात आता भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत, काळे […]
शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…
मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशाराही देखील शरद पवार यांनी मोदी […]
अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा
मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत.” अशी माहिती शिरोमनी अकाली दलाच्या नेत्यांनी दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंजाबातील शिरोमनी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन […]
शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार
नवी दिल्ली : ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी […]
अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा
मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार यांनी सकाळी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे […]
थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायक दिलजीतने केली एक कोटींची मदत
नवी दिल्ली : ”‘प्लीज, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या इतकीच आमची विनंती आहे. येथे शेतकरी शांततेत आंदोलन कतोय. संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे.’ असे म्हणत पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने केंद्रसरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधू बॉर्डरवर पोहचला. विशेष म्हणजे यावेळी थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत […]
शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला
नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आणखी कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठक संपली असून आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा […]
संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेने देखील या बंदला समर्थन दिले आहे.केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, शेतीमालास हमीभाव जाहीर करावा.या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ०७ डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी […]
तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या […]