नवी दिल्ली : लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. अशी धक्कादायक माहिती सापदली असल्याचा दावा विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असंही त्यांनी […]
Tag: कृषी कायदे
का निष्फळ ठरतेय शेतकरी नेत्यांशी होणारी प्रत्येक बैठक; कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण
नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती आहेत, शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नसल्याने […]
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे रवाना
मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २ महिन्यांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा […]
सुपारी किलरचा घुमजाव; शेतकऱ्यांनी सांगितले तसं बोललो
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातील नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका तरुणाला शुक्रवारी शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला. माध्यमांसमोर त्याने हत्येच्या कटाची कबुलीही दिली. मात्र आता अचानक या तरुणाने घुमजाव करत शेतकऱ्यांनीच असं करण्यास भाग पडल्याचा आरोप त्याने केला आहे. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तरुणाने केलेल्या घुमजावमुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, शेतकरी […]
शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची ११ फेरीदेखील निष्फळ
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची ११ वी फेरी झाली. मात्र आजची चर्चादेखील निष्फळ ठरली आहे. तर, ”11 व्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.” अशी […]
शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने […]
सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे: अखिल भारतीय किसान सभा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 53वा दिवस आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. तसचं सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे आणि शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे. इतकच नव्हे […]
कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तत्परता सर्वोच्च न्यायालयाला कुठून आली?: घटनातज्ज्ञ उल्हास बापट
नवी दिल्ली : ”सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोहसारखे कायदे असताना अचानक सुप्रीम कोर्टाला याबाबत इतकी तत्परता कुठून आली हे मला कळत नाही,” अशी टिप्पणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देत शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यांची एक समिती नेमली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने समितीमध्ये कृषी कायद्यांना समर्थन देणाऱ्यांचा समावेश […]
कृषी कायदे मागे घ्या नाहीतर आम्ही कारवाई करु; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला इशारा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली. मात्र केंद्र सरकारच्या या […]
तेव्हा ब्रिटीशांनी मारले आणि आता मोदी सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. ”आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. असे शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे. पण भाजपचे मोदी सरकार अहंकाराने पेटले आहे. कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसातही शेतकरी पेटून उठला आहे. हे असे प्रेरणादायी चित्र स्वातंत्र्यपूर्व काळातही दिसले […]