नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]
Tag: महाराष्ट्र
महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित […]
सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल; सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम
मुंबई : सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ […]
दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी घट; १८८ मृत्यूची नोंद
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ४३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ४२ हजार […]
राज्यातील या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध हटणार
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक […]
मध्यरात्री निघाले आदेश; अनलॉकचा मिटला गोंधळ, असे आहेत नवीन नियम
मुंबई : राज्यात चालू असलेला अनलॉकचा गोंधळ संपला असून मध्यरात्री राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन […]
ब्रेकिंग! मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने काढला जीआर
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10% लाभ घेऊ शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, […]
ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; अशी आहे नवीन नियमावली
मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी […]
दिलासादायक! राज्यातील मृतांच्या आकड्यात घट; नव्या रुग्णांची आकड्यातही घट
मुंबई : कोरोनामुळे सगळीकडे हाहाकार माजला असताना राज्यातील मृतांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज दिवसभरात ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रमाण ४५३ इतकं होतं. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने ५००च्या वर राहिलं आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे. त्याचबरोबर, आज दिवसभरात राज्यात २१ हजार २७३ नव्या […]
राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही राहणार कायम; पण… राजेश टोपेंची माहिती
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतरही वाढवण्यात आला असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये […]