मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या शंका दूर केल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले की, ”भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. […]
कोरोना इम्पॅक्ट
लसीकरणानंतर १३ जणांना फेसिअल पॅरालिसीस; आकडा वाढण्याची भीती
इस्रायल : इस्रायलमधील १३ जणांना कोरोनाची लस घेतल्यानंतर फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. विनोने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलमधील आरोग्य विभागाने अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. अनेकजण करोना लसीच्या या साईड इफेक्टमधून बाहेर आले असले तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. […]
कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु
अहमदनगर : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर कोणालाही लसीचा दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, काल कोरोनाची लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लस घेतल्यानंतर […]
राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
मुंबई : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम उत्साहात सुरु झाली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका […]
लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच लसीकरण मोहिम कधी सुरु होईल हा प्रश्न सर्वांसमोर होता. परंतु आता त्याचे उत्तर मिळाले असून केंद्र सरकारने लसीकरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात […]
लसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण […]
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर
मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 […]
धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला असला तरी नवा कोरोना हातपाय पसरताना दिसतो आहे. नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्याचाही धोका वाढला आहे. पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या आता 4 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील नव्या […]
दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात
पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्ग कमी झालेला नाही आणि धोकाही टळलेला नाही. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र दिलासादायक असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४.८७ टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. आज दिवसभरात […]
अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला
नवी दिल्ली : फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती. त्यानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनीदेखील पूनावाला यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ”लसीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे. आम्ही २०० टक्के […]