नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. शेतकरी आंदोलकांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आज दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे […]
बातमी
कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाची चर्चा
नवी दिल्ली : देशातील कोरोना साथीचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत असलेल्या तीन कंपन्यातील टीम सोबत चर्चा करणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत प्रगती पथावर असलेल्या जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये दिली आहे. आज ३० […]
वंशाच्या दिव्यासाठी विझवली पणती; पवारांच्या काटेवाडीत आईनेच केला सव्वा महिन्याच्या मुलीचा खून
बारामती : तिसरी ही मुलगी झाल्याचा नैराश्यातून आईने सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याची घटना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या काटेवाडी गावात घडली आहे. या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडाली होती. बारामती तालुका पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केल्यानंतर हा खून आईनेच केला असल्याचे निष्पन्न झालं आहे. आई दिपाली संदीप झगडे हिला आज (ता. २९) पोलिसांनी […]
दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी घटली
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कaरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत होती. मात्र एक दिलासादायक वृत्त असून मागील दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली. […]
सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा
राळेगणसिद्धी : “सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?” असा खोचक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत पाठींबाही दर्शवला आहे. अण्णा हजारे म्हणाले, “कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी […]
मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक संपन्न; झाला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
मुंबई : ”मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना […]
‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
नवी दिल्ली : ”बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही. असे म्हणत दिल्लीतील अनोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावले आहे. कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन केले होते. मात्र […]
‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण; प्रकृती नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर
मुंबई : अभिनेत्री दिव्या भटनागर हिला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दिव्याच्या आईने टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना ही माहिती दिली. नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची […]
‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो’
सातारा : ”देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो,” असे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार […]
उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा; मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा…
सातारा : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या पीढीतल्या लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. ” मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या […]