मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी ट्वेन्टी सामन्यादिवशी वरुणराजाच्या हजेरीने सामना रद्द झाल्यानंतर सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्याची. ‘बे ओव्हल’ मैदानात खेळपट्टीपेक्षा वातावरण भारतासाठी त्रासदायक ठरू शकते. या मैदानात जोरदार वारे वाहतात आणि त्याचबरोबर वातावरण थंड असते. या वातावरणाचा फटका भारतीय संघाला चांगलाच बसू शकतो. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू […]
क्रीडा
BCCI चा मोठा निर्णय, विश्वचषकातील लाजीरवाण्या पराभवानंतर दिली निवड समितीसाठी जाहीरात
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. पण या पराभवानंतर आता बीसीसीआने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता निवड समितीसाठी नवीन जाहीरात दिली आहे. या जाहीरातीमध्ये निवड समिती सदस्यांसाठी का नियम असतील आणि कोण पात्र ठरतील, हे देखील स्पष्ट केले आहे. बीसीसीआय विश्वचषकातील पराभवानंतर मोठा निर्णय घेईल, असे वाटत होते. […]
इंग्लंडने टॉस जिंकला आणि भारताला मिळाल्या दोन गुड न्यूज; रोहितने निवडली धाकड टीम
ॲडलेड: आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनल लढतीला सुरूवात झाली आहे. ॲडलेड ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीमधील विजेता संघ १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न मैदानावर पाकिस्तानविरुद्ध जेतेपदासाठी लढले. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. असा आहे भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, […]
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला, कारण आलं समोर
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया – शोएब लवकरच तलाक घेणार आहेत. त्यांचा घटस्फोटोचा निर्णय झाला असून त्या दोघांच्या एका जवळच्या मित्रानेच ही माहिती दिली आहे. सध्या शोएब मलिक पाकिस्तानात आहे. एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी तो टी-२० वर्ल्ड कपसंबंधित काम करत आहे. सानिया मिर्झा दुबईत […]
टी-२० विश्वचषक २०२२ : इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीचा टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. खेळपट्टी आणि हवामान खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि स्क्वायरमधील लहान चौकार फलंदाजांना मोठे फटके मारण्यास प्रोत्साहित करतात. खेळपट्टीमुळे फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे. आकाशात हलके ढग असतील पण पावसाची […]
सेमीफायनलचे ५ फॅक्टर; इंग्लंडवर भारी पडू शकते टीम इंडिया
ऑस्ट्रेलियाचं यजमानपद असलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज १० नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड आमने-सामने असतील. हा सामना अॅडिलेड ओवल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे आपापल्या संघांना फायनलचं तिकीट मिळवून […]
शोएब अख्तरला पराभवाची घाई झालीय फार; आधी इंग्लंडची खिल्ली उडवली आणि मग भारताला…
ॲडलेड: टी-२० विश्वचषक २०२२ ची रंगत आता अधिकच वाढली आहे. आपल्या नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत दाखल झालेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंडविरुद्ध आहे आणि हा सामना भारताने जिंकल्यास अंतिम फेरीत हायव्होल्टेज लढत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पाहण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे. […]
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी
ॲडलेड: टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध आज भारताची लढत होणार आहे. जेतेपदापासून दोन पावले दूर असलेला भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लिश संघाला चारण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. भारताने गट सामन्यात इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आहे पण आता ती भूतकाळातील गोष्ट आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयाने या टप्प्यावर पोहोचल्यानंतर जुन्या आकड्यांचा काहीच […]
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पैशांचा पाऊस पडणार; इतक्या कोटींचं बक्षिस
मुंबई : पकिस्तानने (Pakistan) टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T 20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये (Semi Final) न्यूझीलंडवर (New Zealand) विजय मिळवत फायनलमध्ये रुबाबात एन्ट्री घेतली आहे. त्यानंतर आता 10 नोव्हेंबरला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता संघ आणि पाकिस्तान यांच्यात […]
भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’
सिडनी : पाकिस्तानचा संघ आता फायनलमध्ये पोहोचला आहे. पण आता फायनलमध्ये कोणाचा सामना करायला आवडेल, असा प्रश्न सामनावीर ठरलेल्या मोहम्मद रिझवानला विचारला होता. त्यावेळी रिझवानने एक भन्नाट उत्तर दिलं आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी सलामी दिली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात विजय साकारता […]