राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ
बातमी महाराष्ट्र

राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर न जाता नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. त्यात आता या निर्बंधांचही पालन करावं लागणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार,मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात. मात्र कोरोनाच्या आणि नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर पडू नये. विशेषतः दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

नववर्षासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली
– कोरोनाची परिस्थिती पाहता नव्या वर्षाचं स्वागत घरातच करावं.
– विशेषत: वयोवृद्ध (60 वर्ष) आणि मुलांनी (10 वर्ष) घराबाहेर पडणं टाळावं.
– 31 डिसेंबरला कोणत्याही धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
– 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्रकिनारे, उद्याने विशेषत: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
– नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा आतषबाजी टाळा, नियमांचं सक्तीने पालन करा
– नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील.
– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
– नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा गर्दी टाळा
– नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असेल.