केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप
राजकारण

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी एका वेबीनारमध्ये बोलताना चार धोरणात्मक क्षेत्रे वगळता सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. या मुद्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रातील सरकार देशातील सर्व सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत नाही. जर तसं करायचं असेल तर त्यासाठी आधी चर्चा करावी लागते. याबाबत राज्यसभा आणि लोसकभेत चर्चा करावी लागते. मात्र, केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढत आहे,” अशी घणाघाती टिका नाना पटोले यांनी केली आहे.

इतकेच नव्हे तर, “जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत. असे असताना केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट करतंय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात रस्त्यांचा विकास करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर फक्त 1 रुपया सेस होता. त्या काळात रस्ते चांगलं करण्याचं काम सुरू होतं. मनमोहनसिंग यांनीही हा सेस सुरू ठेवला. मात्र मोदी सरकारच्या काळात हा सेस तब्बल 18 रुपयांवर पोहोचला आहे.”असही म्हणत त्यांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा नारा दिला. “सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण आहे. काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा. स्वबळावर लढण्यास तयार रहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल. त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा,” असे नाना पटोले म्हणाले.