तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…
राजकारण

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…

तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन; तृणमूलच्या खासदाराचे आव्हान
नवी दिल्ली : ‘माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन,” असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डायमंड हार्बर मतदारसंघातून खासदार असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी यांनी कुलताली विधानसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. बॅनर्जी म्हणाले की, केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन असं देखील म्हटलं आहे.

तसेच, “कैलाश विजयवर्गीय यांच्यापासून शुभेन्दु अधिकारींपर्यंत आणि मुकुल रॉय यांच्यापासून ते राजनाथ सिंह यांच्यापर्यंत भाजपा नेत्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजपाच्या महत्वाच्या पदांवर आहेत. जर एका कुटुंबातील एकच सदस्य सक्रीय राजकारणामध्ये असण्याबद्दलचा कायदा केला तर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केवळ ममता बॅनर्जी राजकारणात असतील, असा मी शब्द देतो” असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शनिवारी व्हिक्टोरिया मेमोरियलमधील घटनेचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी जय श्री रामच्या घोषणा मुद्दाम देण्यात आल्या. ममता यांनी भाषण देऊ नये म्हणून या घोषणा करण्यात आल्या असं देखील अभिषेक बॅनर्जी यांनी दिलं आहे. जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याने ममता यांनी भाषण देण्यास नकार दिला.”

खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “’तुम्ही मंदिरात, धार्मिक कार्यक्रमात, तुमच्या घरात एक हजार वेळा जय श्री राम चा जयघोष करा, पण नेताजींसारख्या वीरांची आठवण म्हणून आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशा घोषणा देऊन त्यांचा अपमान केला तर आम्ही विरोधच करू, इतकेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालदेखील याचा निषेध करेल, असेही ममता बॅनर्जी यांनी केंद्रसरकारला ठणकावून सांगितल्याचे स्पष्ट केले.