उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला
राजकारण

उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोलावं; निलेश राणेंचा टोला

मुंबई : ”देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2021-22 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. मात्र निर्मला सीतारामन अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

तर विशेष बाब म्हणजे, अर्थसंकल्पाचे वाचन करता निर्मला सीतारमण यांनी महाराष्ट्रातील नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले. तसेच, ट्वीटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले.

ते म्हणाले की, ”केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे.नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आली.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.”