मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक भाजपा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाचे कल्याणराव काळे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे म्हंटल्यानंतर काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा […]
Tag: भाजपा
निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…
मुंबई : “अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत. शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे.” अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, नुसतं भाजपावर […]
तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल
कोल्हापूर : ”आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ”धनगर समाजासाठी आरक्षण […]
तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी […]
भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
कोल्हापूर : आयारामांना पदे आणि सन्मान देण्याच्या धोरणातून कोल्हापूर भाजपामधला अंतर्गत वाद समोर आला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी […]
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच, ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस […]
रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ अटकेनंतर भाजपाची राज्यसरकारवर टीका
मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन TRP वाढवण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा […]
खडसे देणार भाजपला पहिला धक्का; भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला पहिला झटका देणार असल्यची चर्चा सुरु झाली आहे. भुसावळचे भाजपाचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान झाले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं बोललं जात होतं. त्याची सुरूवात आमदार संजय […]
कुटुंब नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : ”किती मुलांना जन्म द्यायचा याचा विचार स्वत: पती-पत्नी यांनी करायला हवा यासाठी केंद्र सरकार नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकत नाही, असं स्पष्टीकरण देत सुप्रीम कोर्टाने भारतात जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावाला विरोध केला आहे. देशातील नागरिकांवर कुटुंब नियोजनाबाबत जबरदस्तीने नियम लादण्याच्या आम्ही विरोधात आहोत, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. देशातील […]
जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी ममता बॅनर्जींचा हल्लाबोल; म्हणाल्या…
नवी दिल्ली : माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का?’ असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्यादरम्यान दगडफेक […]