अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकाबरोबरच कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवालं. कसोटी क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं अर्धशतक ठरलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय […]
Tag: विराट कोहली
इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक
नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून परत आल्यानंतर संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. NEWS 🚨 : BCCI, ECB announce itinerary for England’s tour of India 2020-21. More […]
ICC ODI Ranking : फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय; गोलंदाजीत बुमराहची घसरण
नवी दिल्ली : काल टी-२० सामन्यांची आयसीसीने रँकिंग जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय सामन्यांची रँकिंग जाहीर करण्यात आली असून फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय आहेत. विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये मात्र भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे. 🔸 One 💯, two fifties🏏 249 runs at 83 Australia captain […]
ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील नुकतीच टॉप १० खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीत केवळ २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर एकाही गोलंदाजाला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी-२० मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-२० क्रमवारीत फायदा झालेला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची […]
विराट म्हणतो म्हणून तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा झाला पराभव
सिडनी : अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १२ धावांनी मात करत व्हाईटवॉशपासून आपला बचाव केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७५ धावांपर्यंत मजल मारु शकला. सामना संपल्यानंतर विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. विराट कोहली म्हणाला, ‘एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या […]
मैदानातच राडा ! विराट आणि अंपायरचा वाद; व्हिडिओ पाहाच
सिडनी : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव झाला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र ११व्या षटकात मैदानातच एक राडा झाला. मॅथ्यू वेडला नटराजन गोलंदाजी करत असताना नटराजने टाकलेला चेंडू वेडला टोलवता आला नाही. चेंडू वेडच्या पायाला लागल्यानंतर नटराजन आणि यष्टीरक्षक राहुलने अपील केलं […]
२०१७पासून भारतीय संघ अपराजित; केला हा मोठा पराक्रम
सिडनी : 2017 पासून भारतीय टी- २० संघ एकही मालिका पराभूत झालेला नाही. तीन सामन्याची टी-२० मालिका भारतानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तीन किंवा त्यापेक्षा जास्त टी-२० सामन्याच्या द्विपक्षीय मालिकेत विराट कोहली आतापर्यंत अजय आहे. तीन सामन्याच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा […]
विराटचा मोठा विक्रम ! असा रेकॉर्ड करणारा एकमेव भारतीय
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत तिसऱ्या सामन्याआधीच २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम केला आहे. ही सीरिज जिंकताच कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमने रविवारी ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-20मध्ये 6 विकेटने पराभव केला. याचसोबत भारताने टी-20 सीरिजही आपल्या नावावर केली. ही सीरिज जिंकताच कर्णधार विराट कोहलीच्या […]
करुन दाखवलं ! भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा विक्रम
सिडनी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये दुसरा टी-२० सामना झाला. यात भारताने दोन चेंडू आणि सहा गडी राखून शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयानंतर भारताने पाकिस्तानचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने पाकिस्तानचा सलग विजयाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला […]
भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात
सिडनी : पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने दुसरा टी- २० सामना ६ गडी राखून जिंकला आहे. कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. १९५ धावांचे आव्हान भारताने २ चेंडू राखूनच पूर्ण केले. […]