मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेबरोबरच्या भविष्यातील युतीबाबत महत्वपूर्ण विधान केले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते […]
राजकारण
हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता
भोपाळ : देशात एक प्रकारे काँग्रेसचा परतीचा प्रवास चालू झाल्याचे त्यांनी केलेल्या काही कामामधूनच सातत्याने दिसत असते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजपनेत्याची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केली आहे. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. […]
भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?
मुंबई : ”काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे. असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ […]
भाजपला मोठे यश; काश्मिरच्या निवडणुकांत मारली बाजी
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आपल्या विजयाची पताका फडकावली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार स्थानिक पक्षांच्या गुपकार आघाडीला सर्वाधिक जागांवर आघाडी आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने श्रीनगरमध्ये पहिला विजय मिळाला आहे. […]
हा तर शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा डाव: असदुद्दीन ओवैसी
हैदराबाद : ”मोदी सरकार नेहमी जे सांगत असते, त्याउलट घडतं. वीज वापराविषयीच्या प्रस्तावित बदलांच्या आधारे शेतकऱ्यांना क्रॉस-सब्सिडीपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. अनेक राज्य आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवत आहेत. वीज वापराविषयीचे प्रस्तावित बदल म्हणजे मिळत असलेली सूट रद्द करून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे.” असे ट्विट् करत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी […]
दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल
मुंबई : गेल्या महिनाभरापासून नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या महिनाभरात शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये चर्चा होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्यानं विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्द्यावरून शिवसेनेनं गुरुवाणीचा अर्थ […]
ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला आहे. ममता यांनी च्यासोबतच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा […]
भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी
कोलकाता : भाजप खासदाराच्या पत्नीनं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या प्रसंगानंतर संतापलेल्या भाजप खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल […]
असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. अतिवृष्टीनंतर तब्बल दोन महिन्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आलं आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे. असा […]
शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले […]