सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला
राजकारण

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई : सचिन वझे यांच्या विरोधात दररोज नवनवीन पुरावे समोर येत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षाने सचिन वझे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना अटक करत तपास सुरु केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत असल्यामुळे ठाकरे सरकार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार पडेल किंवा सरकार अस्थिर झालं या भ्रमातून सगळ्यांना बाहेर पडावं. एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही. सरकार पुढचे साडेतीन वर्ष चीतपट करणे कुणालाही जमणार नाही. या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस तपास करत आहे. केंद्रीय संस्था तपास करत असताना त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. मात्र त्यावर आमचं लक्ष आहे. कॅबिनेट बैठका सचिन वाझे प्रकरणामुळे होत नाहीयेत, सचिन वाझे प्रकरण ही लहान गोष्ट आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही. सचिन वाझे प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळात काहीही घडामोडी घडत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, पुढील साडेतीन वर्ष सरकार पडणे शक्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मात्र एखादी व्यक्ती आधी शिवसेनेशी संबधित असेल तो काय गुन्हा नाही. शिवसेना बंदी घातलेली संस्था नाही. प्रत्येक मराठी माणून कधीनाकधी शिवसेनेशी संबधित असतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी त्यांना राज्यात खातेबदलाच्या चर्चा सुरु असल्याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील निर्णय असतो. मात्र सरकार तीन पक्षांचं असल्याने तीन पक्षाचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतात. त्यावर मी बोलणे योग्य नाही. असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसात अनेक प्रकरणांमध्ये पाहिले गेलं आहे की एनआयए किंवा केंद्रीय संस्थांना अटकेची घाई असते. ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथे जाऊन कारवाई करण्याचा छंद काही लोकांना जडला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही आपण ते पाहिलं आहे. ईडी प्रकरणात अनेकदा पाहिलं आहे. महराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्येही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.