क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातून निसटलेला सामना एका षटकात आपल्या संघाच्या बाजूने फिरवतो. युरोपात खेळवल्या जाणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेत एका गोलंदाजाने काहीशी अशीच कामगिरी करून दाखवली. युरोपात सुरू असलेल्या १० षटकांच्या T-10 स्पर्धेत त्याने एकाच षटकात […]
Tag: क्रिकेट
न्यूझीलंडने डावाने जिंकली सलग दुसरी कसोटी; विंडीजला व्हाईटवॉश
न्यूझीलंडच्या संघाने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करत सलग दुसऱ्या कसोटीत डावाने विजय मिळवला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिजचा डावाने पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने विंडीजवर १ डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सचं शतक आणि कायल जेमिन्सनचा भेदक मारा ही प्रमुख […]
जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन
मोहाली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते असे युवराजने ट्वीट […]
मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी असून भारताचा महत्वाचा फलंदाज रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यामुळे तो १३ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी मुकणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आयपीएलदरम्यान मांडीचे स्नायू ताणले […]
इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक
नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून परत आल्यानंतर संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. NEWS 🚨 : BCCI, ECB announce itinerary for England’s tour of India 2020-21. More […]
ICC ODI Ranking : फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय; गोलंदाजीत बुमराहची घसरण
नवी दिल्ली : काल टी-२० सामन्यांची आयसीसीने रँकिंग जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय सामन्यांची रँकिंग जाहीर करण्यात आली असून फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय आहेत. विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये मात्र भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे. 🔸 One 💯, two fifties🏏 249 runs at 83 Australia captain […]
ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील नुकतीच टॉप १० खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीत केवळ २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर एकाही गोलंदाजाला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी-२० मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-२० क्रमवारीत फायदा झालेला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची […]
ऑस्ट्रलियाविरुद्धचा सामना अनिर्णित; दुसऱ्या डावात साहाचे अर्धशतक
सिडनी : ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धचा सराव सामना अनिर्णितावस्थेत संपला असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली. परंतु मध्यमगती गोलंदाज मार्क स्टीकेटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर केवळ यष्टीरक्षक वृद्धीमान साहा तग धरू शकला. त्याने १०० चेंडूंचा सामना करीत ५४ धावा केल्या. पहिल्या डावात ५९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत अ संघाने […]
आणखी एका खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती; ट्विटरवरुन निर्णय जाहीर
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आणखी एका खेळाडूने सर्वप्रकराच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत राहायचा. pic.twitter.com/QbqdHX00dR — parthiv patel (@parthiv9) December […]
विराट म्हणतो म्हणून तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा झाला पराभव
सिडनी : अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १२ धावांनी मात करत व्हाईटवॉशपासून आपला बचाव केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७५ धावांपर्यंत मजल मारु शकला. सामना संपल्यानंतर विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. विराट कोहली म्हणाला, ‘एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या […]