नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]
Tag: रोहित शर्मा
WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाकडून अंतिम ११खेळाडूंची घोषणा
नवी दिल्ली : शुक्रवार १८जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघाच्या अंतिम ११खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]
रोहित शर्मा लवकरच होईल भारतीय संघाचा कर्णधार
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला लवकरच कर्णधारपदाची संधी मिळू शकते असं निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही किरण मोरे यांनी व्यक्त केली आहे. मोरे म्हणाले, ‘मला वाटतं बोर्डाचं व्हिजन काय आहे […]
मुंबईचा पंजबाविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम
मुंबई : चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, मुंबईसाठी हा निर्णय चांगला ठरला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त २१ धावा केल्या. या दरम्यान मुंबईने सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉकला गमावले. सामन्याच्या दुसऱ्याच […]
बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; अ+ श्रेणीत केवळ ३जणांची वर्णी
नवी दिल्ली : बीसीसीआयकडून ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी खेळाडुंचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले आहेत. अ+ श्रेणीत केवळ ३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरले आहेत. तिघांनीही अ+ श्रेणीत स्थान राखले असून त्यांना वर्षाला सात कोटी रुपये […]
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय
मुंबई : इंडियन प्रिमीयर लिगचा रणसंग्राम चालू झाला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघावर शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला झटपट […]
रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
पुणे : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या जोडीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी भारतासाठी मोठे काम करत आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित आणि शिखर या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी नोंदवणारी ही भारताची दुसरी जोडी आहे. यापूर्वी, सचिन […]
रोहित शर्माचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धचा चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक खास विक्रम नोंदवला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रोहित झेल देऊन लवकर माघारी परतला असला तरी त्याने 12 धावा केल्या. या 12 धावांमुळे त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहितने 342 टी-२० सामन्यांत खेळताना 9000 धावा पूर्ण केल्या. यातील 2,800 धावा त्याने आंतराष्ट्रीय […]
Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात असा असेल संभाव्य भारतीय संघ
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी-२०सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडने सहज मात दिली होती. त्यानंतरच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने इंग्लंडवर सात गड्यांनी मात केली. आयपीएल गाजवलेल्या […]