नव्या संसद भवनाच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेशही न्यायलयाने दिलेत. दरम्यान, नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. मात्र १० डिसेंबरच्या […]
देश
8/12 च्या भारतबंदबाबत बेस्ट प्रशासन आणि टॅक्सी युनियनचा महत्वाचा निर्णय
मुंबई : भारतातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. याला राज्यातील विविध संघटनांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, दरम्यान भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने याबद्दल माहिती दिली. तसेच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलं आहे. बेस्ट बसेस उद्या रस्त्यांवर धावतील. त्या भारत बंदचा […]
सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय
नवी दिल्ली : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा झटका बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध […]
दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट; पाच दहशतवाद्यांना अटक
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये घातपाताच कट उधळून लावत पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पाच जण इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र […]
#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद
नवी दिल्ली : देशभरात मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. अशा […]
बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशभरातून विविध स्तरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. अशातच देशातील खेळाडूंनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास आपले पुरस्कार परत करण्याचीदेखील घोषणा केली आहे. यात आता भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत, काळे […]
मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरीच मोदींच्या विरोधात
नवी दिल्ली : गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी सातत्याने अपयशी होणाऱ्या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत. अशात मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेलाच शेतकरी मोदींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. पीएम मोदींनी मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातील एक शेतकरी जितेंद्र […]
डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरताय? मग रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी पासून केलेले ‘हे’ बदल आधी वाचाच
नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या नियमात हा बदल होणार आहे. या बदलामुळे तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 5000 रुपयांपर्यंत कोणत्याही पिनशिवाय सहज पेमेंट करू शकता. आतापर्यंत […]
शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार
नवी दिल्ली : ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी […]
पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या १५ दिवसांत तेलाच्या किमती १३ वेळा वाढल्या असून त्याचा भारतातील दरावरही परिणाम झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरला ८३ रुपये १३ पैसे झाला असून तो दोन वर्षांतील उच्चांकी दर आहे. डिझेलचे दर राज्यातील सात जिल्ह्य़ांत लिटरला ८० रुपये झाले असून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्य़ांत पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या वर गेले […]