नवी दिल्ली : ”माझ्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यामुळे मला १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगनाच्या हातात काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.” असा खोचक टोला महिंदर कौर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला लगावला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कर यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतला पैसे घेऊन शेतकरी […]
देश
#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
नवी दिल्ली : ”आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय […]
उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू
लखनौ : रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातामध्ये आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून […]
एलपीजीचे दर भडकले; पाहा आजपासूनचे नवीन दर
नवी दिल्ली : आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर जवळपास ५५ रुपयांनी वाढला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजीही महाग झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडर महाग […]
केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य
नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग सहाव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र आता कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. आज दुपारी ३ वाजता केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आज […]
जेएनयूची विद्यार्थीनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप; वडिलांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली : जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदच्या वडीलांनी तिच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. अब्दुल रशीद असे तिच्या वडिलांचे नाव आहे. ते म्हणाले की, आपली मुलगी ज्या पद्धतीने भरपूर पैसा खर्च करून एनजीओ चालवित आहे, तेथूनच तिचे दहशतवाद्यांशीही संबंध असू शकतात हे स्पष्ट आहे. केंद्रीय एजन्सींकडे त्यांनी मुलीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेहला रशीदच्या […]
#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही
जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला […]
शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन
नवी दिल्ली- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या जाचक कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून राजधानी दिल्लीत मोठ्या स्वरुपाचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांसह आता तेथील पंचायती देखील समोर आल्या आहेत. प्रत्येक घरातील एक व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल, असा निरोप पंजाब व हरियाणाच्या पंचायतींतून दिला जात आहे, […]
योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.२) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. याच […]
विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
मुंबई- जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हीच मर्यादा इतर कार्यक्रमांना देखील लावण्यात आली आहे. या विरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू […]