केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून त्या रद्द होणार नसल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी सीबीएसईकडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.