शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…
राजकारण

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…

कोल्हापूर : ”मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर आहे. मात्र मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. राज्य सरकार या विषयांत गंभीर आहे.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. यावेळी बोलताना ते म्हणाले की ” कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी असल्याचं म्हणत कायदा रद्द करा आणि चर्चेला बसा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्राकडे केल्याची बबा पवारांनी यावेळी प्रकाशझोतात आणली. आपण यापूर्वीसुद्धा शेतकरी आंदोलनातील महत्त्वाच्या मंडळींशी चर्चा करुन त्यांच्याशी विचारविनिमय केल्याचं म्हणत दीड वर्षे कायदा स्थगित करण्याची मागणी शेतकऱ्यांना मान्य नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी दिली.

शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. ज्यावरही प्रतिक्रिया देत शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता अशी भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या भाष्याविषयी देखील एक मिश्कील प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. “राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे”, असं ते म्हणाले होते.

याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, अशी मिश्कील प्रतिक्रिया देत शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले.