मुंबई : शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, की परमबीर सिंह यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या […]
Tag: राजीनामा
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ; शरद पवार
मुंबई : परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर आहेत. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा […]
ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर निशाणा
मुंबई : ”राज्याच्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद […]
उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
मुंबई : सचिन वझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा नेते […]
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवसाथानाबाहेर एका कारमध्ये स्फोटक सापडली. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांचा सहभाग, मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. विरोधी पक्षाही विधानसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या सर्व प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला […]
महाविकास आघाडी सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे; प्रवीण दरेकरांची टीका
मुंबई : ”महाविकास आघाडी सरकारमध्ये संवेदना उरलेली नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा आरोप करत आघाडीच्या एका आमदाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि […]
संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचलाच नाही? पण का?
पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या […]
धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे
मंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला जावा अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली […]
राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणी काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ”काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी,” असं […]
संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. […]