”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” असा प्रश्न विचारात गायक मिका सिंहने आता अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या वादात उडी घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला कंगना रानौतने विरोध केला आहे. तर दिलजीत दोसांजने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एक आजी सध्या सोशल मीडियावर […]
Tag: शेतकरी आंदोलन
‘नवे कृषी कायदे शेतकरीविरोधीच’; सुप्रीम कोर्ट बार असोसीएशन
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आता देशभरातून पाठींबा मिळत आहे. दिल्ली बार कौन्सिल (बीसीडी) नंतर आता सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष दुष्यंत दवे यांनीदेखील शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील एचएस फूलका यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना सांगितले की, ‘मोदी सरकारचे नवीन कृषी कायदे […]
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवरच गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. मात्र आता येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून देशातील सर्व टोल बंद करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी मोदी सरकारच्या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे पुतळेदेखील जाळणार आहोत. अशी माहिती पत्रकार परिषदेत […]
ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न
नवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ […]
मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये बैठक झाली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये […]
आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका
नवी दिल्ली : मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब- हरियाणा या दिल्ली लगतच्या राज्यांमध्ये याविरोधात तीव्र जनभावना आहेत. आता खुद्द संघाच्या मुशीत वाढलेल्या स्वदेशी जागरण मंचानेदेखील या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचं ठोस […]
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]
अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर
नवी दिल्ली : ”माझ्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यामुळे मला १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगनाच्या हातात काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.” असा खोचक टोला महिंदर कौर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला लगावला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कर यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतला पैसे घेऊन शेतकरी […]
#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
नवी दिल्ली : ”आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय […]
आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले
नवी दिल्ली : ” कॅनडामधील लोकप्रतिनिधींना भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही. टुडो यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे ” अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांना सुनावले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. या आंदोलनाला आता थेट कॅनडाचे पंतप्रधान […]